शेतकरी आंदोलनात पहिला बळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंजाब येथील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत सुरु केलेल्या आंदोलनाचा शुक्रवारी चौथा (16 फेब्रुवारी) दिवस आहे. दरम्यान, अश्रुधुरांच्या नळकांड्यांनी जखमी झालेल्या ज्ञान सिंह या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. गुरुदासपूर येथील रहिवासी असलेल्या ज्ञान सिंह या आंदोलनातला पहिला बळी ठरला आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीला जाण्यासाठी मोर्चा काढल्याने दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. या दिल्लीच्या चारी दिशेने सरकारने आंदोलकांना रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त केला आहे. शेतकऱ्यांनी किमान हमी भावासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरु झाल्याने सरकार अडचणीत सापडले आहे. दिल्ली पोलिसांनी आणि केंद्रीय राखीव दलाने केलेल्या अश्रुधुरांच्या माऱ्यांमध्ये शंभू सीमेवर जखमी झालेल्या ज्ञानसिंग या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हे शेतकरी गुरुदासपूरच्या चाचौकी गावचे रहिवासी असून, यंदाच्या शेतकरी आंदोलनातील हा पहिलाच मृत्यू मानला जात आहे.

Exit mobile version