‘गद्दारांचे सरकार उलथवणार’

| नेरळ | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्यातील घटनाबाह्य सरकार उलथवून टाकायचे आहे आणि गद्दार सरकार हरवून राज्यात परिवर्तन करायचे, असा निर्धार युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोणालाही फसवू शकत नाही असे महाराष्ट्र राज्यातील जनतेला वाटत आहे आणि त्यामुळे राज्यातील जनता महाविकास आघाडीचे सरकार आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी या सभेत व्यक्त केला.

कर्जत विधानसभा मतदारसंघ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसंवाद सभेचे आयोजन केले होते. ते पुढे म्हणाले की, हे घटनाबाह्य सरकार पायउतार होत नाही, तोपर्यंत मी त्यांना कायम घटनाबाह्य म्हणणार आहे. जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा पक्ष महाराष्ट्रात 9 वर येऊन ठेवला आहे. हा सर्व चमत्कार मतदार राजा करू शकतो असे सांगून महविकास आघाडीचे सरकार आणून परिवर्तन करायचे आहे.

शिवसेना उप नेते आमदार सचिन अहिर, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही सभेला संबोधित केले. किरवली येथील शेळके मंगल कार्यालयात सभेला त्यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मावळ लोकसभा मतदारसंघ संघटक संज्योग वाघेरे, जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, महिला आघाडी जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, जिल्हा सल्लागार रियाज बुबेरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी प्रास्ताविक केले.

Exit mobile version