अनधिकृत बांधकाम बाबतचे उपोषण स्थगित

| कर्जत | वार्ताहर |

कर्जत मधील उल्हास नदी पात्रातील अनधिकृत भराव आणि बांधकाम बंद करून काढून टाकावे यासाठी मंगळवारी (दि.19) सकाळी 11 वाजल्यापासून किसान मोर्चा आणि शेतकरी-गावकरी लोकमान्य टिळक चौक कर्जत येथे आमरण उपोषणाला बसणार होते. परंतु, जिल्हाधिकारी यांनी 16 मार्च पासून जिल्ह्यात जमावबंदी, आंदोलने, मोर्चे, उपोषण यावर 6 जून पर्यत बंदी घातली आहे. त्यामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे, अशी महिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी सुनील गोगटे, अतुल बडगुजर, जनार्दन म्हस्कर, विनायक पवार, शिरीष कदम, हरिश्चंद्र मांडे, सर्वेश गोगटे, मिलिंद भोईर उपस्थित होते.

Exit mobile version