। कर्जत । वार्ताहर ।
आयुर्वेदाच्या उपचाराचा परिणाम उशिरा दिसतो असा समज आहे. मात्र तो योग्य रीतीने केल्यास एका मिनिटात त्याचा परिणाम दिसू लागतो. ग्रामीण भागात आपल्या अवतीभोवती औषधी वनस्पती आहेत. त्याचा उपयोग कसा करायचा हे माहिती झाल्यास अनेक व्याधी घरीच बर्या करता येतील. पुढील काळात आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्योविस आयुर्वेदचे डॉ. राज सातपुते यांनी येथे केले. कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालय कर्जत, नारी सामाजिक संघटना दादर मुंबई आणि तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानच्या वतीने ज्योविस आयुर्वेद, दादर मुंबईच्या सहकार्याने फार्मसी महाविद्यालयाच्या सेमिनारमध्ये आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते.
प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी आयुर्वेदाचे महत्व विशद केले.डॉ. ज्योती सातपुते यांनी, शरीरामधील चरबी, वजन, उंची प्रमाणे आहार कसा असायला हवा. आयुर्वेद हे सत्य आहे. मात्र त्याचा अभ्यास करून उपचार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदिक उपचार म्हणजे लोकांना फक्त काढा, चूर्ण आणि पंचकर्म नसून आहार, विहार आणि विचारांची गरज कशी आहे, या विषयी मार्गदर्शन केले. आधुनिक जगात स्पर्धा, डिप्रेशन, वाढल्याने अनेक मानसिक व शारीरिक व्याधी वाढत आहेत. त्या आयुर्वेदिक योग्य उपचाराने पूर्णपणे बरा होतो. गुढघे दुखी किंवा खांदा दुखी बरी करण्यासाठी त्याचे मूळ शोधले पाहिजे, असे स्पष्ट केले.
यावेळी डॉ. प्राची चावडा, डॉ. सिद्धी लवंगारे, पूजा वाघमोडे आदींनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी विद्धकर्म, अग्निकर्म,रक्त मोक्षण, त्वरित चामखीळ काढणे, दूषित रक्तकाढून दुखणे थांबवणे आदी उपचार केले. एकूण 216 जणांची या शिबिरात तपासणी करण्यात आली. याप्रसंगी ज्योविस आयुर्वेदचे डॉ. राज सातपुते, डॉ. सोनाली घाणेकर, अस्मिता सावंत,मुकेश सुर्वे, विजय मांडे, दीपक बोराडे, ज्ञानेश्वर जाधव, प्रा. प्रीतम जुवाटकर, मृदुला गडणीस, प्रा.निलोफर खान, प्रा. रुपाली येवले, प्रा. शिशुपाल बोधले, पी. के. देशमुख, लीना गावडे, ज्योती पाटील, सानिका सावंत, प्रमिला गोंधळे, सुप्रिया देशमुख आदी उपस्थित होते.
डॉक्टर म्हणजे देवच
एक रुग्ण अगदी शिबिर संपताना आला. डॉक्टर राज सातपुते यांनी जाता जाता त्या रुग्णाची विचारपूस करून तपासले आणि आपले कर्तव्य बजावले. त्यावेळी त्या रुग्णाने तुम्ही माझ्यासाठी खरच देवच आहात, असे उदगार काढले