| माणगाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी चारही बाजूने मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असते. या ठिकाणी महामार्गावर नेहमीच भटके कुत्री व इतर प्राणी व्यत्यय आणत असतात. कधी कधी या ठिकाणी अपघात होउन भटके प्राणी मृत्यू पावत आहेत. मृत झालेल्या भटक्या प्राण्यांचे शव रस्त्यावरच पडून राहिल्याने त्यांच्या शवाची हेळसांड होत असून हे शव कुजत असल्याने वाहनचालक पादचारी व स्थानिकांना दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शव उचलून नेण्याची व्यवस्था प्रशासनाने करणे आवश्यक आहे.