देशाला गुलामगिरीकडे नेण्याची वाटचाल- प्रा. एस.व्ही. जाधव

| प्रमोद जाधव | स्व. गणपतराव देशमुख नगरी,पंढरपूर |

शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन शेतकरी कामगार पक्ष काम करत आहे. आपण जो विचार घेऊन जात आहोत, त्याचा विजय निश्‍चित असून, भांडवलशाहीचा पराभव अटळ आहे. मोदी जेव्हापासून सत्तेत आले, तेव्हापासून स्वतःची जाहिरात केली. मनुवादी व्यवस्था आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपची विचारधारा सामाजिक विषमता, गुलामगिरीकडे नेणारी आहे. वर्णव्यवस्था आणण्यासाठी खटाटोप चालू आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा देश मोदी नाही, तर भांडवलदार चालवत आहे, अशी घणाघाती टीका प्रा. एस.व्ही. जाधव यांनी केली.

Exit mobile version