सुरांचे वलय कायम राहिल; सुलोचना चव्हाण

। मुंबई । वृत्तसंस्था
संध्यापर्वातली वैष्णवी असा ज्यांच्या उल्लेख कवी ग्रेस करतात त्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. कलासृष्टीतील कलाकार आणि गायक, संगीतकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लताताई गेल्या, खूप वाईट वाटले. एक भावना प्रधान सूर गेला. लताताई तुमच्या आवाजाची जादू आणि सूरांचे वलय कायम ह्या पृथ्वीभोवती राहील यात शंकाच नाही, ओम शांती शांती शांती. – सुलोचना चव्हाण, ज्येष्ठ अभिनेत्री

Exit mobile version