राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधूकर पाटील यांनी केली स्पष्ट भूमिका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आगामी निवडणुकीत समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आघाडी करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधूकर पाटील यांनी स्पष्ट करताना शेतकरी कामगार पक्षासोबत जाण्यास त्यांनी तयारी असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचा शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातील महत्वाचा घटक पक्ष आहे. ही आघाडी अद्याप कायम आहे; मात्र, शिवसेनेमधील फुटीर गटाशी कोणताही संधान बांधण्याचा राष्ट्रवादीचा विचार नसल्याचे मधूकर पाटील स्पष्ट केले आहे.
माजी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथे झालेल्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मधुकर पाटील यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली. सुरेश लाड यांच्या राजीनाम्यानंतर मधुकर पाटील यांच्यावर प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर मधुकर पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
याचाच एक भाग म्हणून गुरुवार (दि.21) रोजी अलिबाग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधण्यासाठी जिल्हा कार्यालयात बैठक घेतली, या बैठकीपुर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीची आगामी भूमिका कोणती असेल हे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, समविचारी पक्षामध्ये भाजपाचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेतील बंडखोर गटाचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडी करुन निवडणुका लढविण्याचाही राष्ट्रवादीने थोडाही विचार केलेला नाही. आगामी निवडणुका पक्षसंघटना मजबूत केली जात असून यासाठी नव्याने पदाधिकारी नेमण्यात येत आहे. अलिबाग येथील बैठकीनंतर जिल्हाध्यक्षकांनी काही पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र दिले. या बैठकीसाठी प्रदेश कार्यकारणीचे सचिव विजय मोरे, अलिबाग- मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अमित नाईक, अलिबाग तालुका अध्यक्ष दत्ता ढवळे, रोहा तालुका उपाध्यक्ष अनिल भगत, जिल्हा चिटणीस चारुहास मगर, अलिबाग शहर अध्यक्ष राजन तांडेल, व्यापारी सेलचे अध्यक्ष सचिन पाटील.