टोमॅटोचे दर नियंत्रणात येणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दरांनी रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला आहे. यानंतर आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर स्वस्त दराने टोमॅटो वितरीत करण्यात येणार आहे. मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो 200 रुपये किलो पर्यंत दराने विक्री केली जात आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ अर्थात नाफेड आणि राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ टोमॅटोची खऱेदी कऱणार आहेत. केंद्रीय मंत्रालयानुसार जिथे किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेत, तिथे स्वस्त किंमतीत विक्री केले जातील.

Exit mobile version