वनिंदू हसरंगाची कर्णधारपदावरून माघार

| श्रीलंका | वृत्तसंस्था |

भारत-श्रीलंका यांच्यामधील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. उभय देशांमधील ही मालिका श्रीलंकेत पार पडणार आहे. दोन देशांमध्ये तीन टी-20 सामन्यांची व तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार असून 26 जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मात्र त्यापूर्वीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्ध मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेला एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याने श्रीलंकेच्या टी-20 संघाच्या नेतृत्वपदावरून माघार घेतली आहे. टी-20 विश्‍वकरंडकात सुमार कामगिरी केल्यामुळे हसरंगा याने नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र खेळाडू म्हणून तो संघात कायम राहणार आहे.

Exit mobile version