| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील धामणी गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी स्थानिकांनी ही अडचणी कशेळे येथील कार्यकर्त्यांना आपली व्यथा बोलून दाखविली होती. दरम्यान, त्या ठिकाणी नवीन बोअरवेल खोदून देण्याचे आश्वासन दिले असून, त्यामुळे तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
कर्जत तालुकामधील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील धामणी गावातील पिण्याची पाण्याची विहिरी तळ गाठते. विहीर आटल्यानंतर गावातील महिलांना मेचकर वाडी आणि गावाच्या पायथ्याशी असलेल्या नदीवर डोक्यावर हांडे घेऊन पिण्याचे पाणी आणण्यासाठी जावे लागते. गावातील महिलांची पाणी आणण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेऊन स्थानिक ग्रामस्थ अक्षय तिटकारे, रमेश मराडे, सोपान आसवले, भरत आसावले, बबन दरवडा, दत्ता वाक, विलास भोईर यांनी कशेळे भागातील कार्यकर्ते दिसले आणि हृषिकेश राणे यांची भेट घेऊन पाणीप्रश्नाबाबत माहिती दिली. त्यानंतर या सर्व मंडळींनी आदिवासी समाजाचे अध्यक्ष भरत शिद यांच्यासह धामणी येथे जाऊन पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी काय करता येईल याची माहिती घेतली. त्यावेळी ग्रामस्थांनी बोअरवेल खोदून देण्याची मागणी केली असता त्या ठिकाणी आठवड्यात बोअरवेल खोदून दिली जाईल, आश्वासन भास्कर दिसले आणि ऋषिकेश राणे यांनी दिले आहे. दरम्यान, बोअरवेल खोदण्याचे काम पूर्ण झाल्यावर धामणी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.