। पेण । प्रतिनिधी ।
पेणमधील उत्कर्षनगर पुन्हा जलमय झाले असून,या जलमय होण्याला तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
1989 च्या पुराच्या दरम्यान कोंबडपाडा, पिंपळडोह आजचा उत्कर्षनगर या परिसरात पाणी शिरले होते. त्यानंतर 2005 ला या परिसरात पाणी शिरले. मात्र मागील 8 वर्षापासून उत्कर्ष नगरच्या घरांमध्ये दरवर्षीच पाणी शिरते. याचे महत्वाचे कारण पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्ग बंद केले आहेत. उत्कर्षनगरमध्ये ग्रीन सिटी हे गृह निर्माण प्रकल्प होण्याआगोदर येथील रहिवाशांना फक्त 1989 आणि 2005 या दोन वर्षीच पुराच्या पाण्याला सामोरे जावे लागले. परंतु जेव्हापासून ग्रीन सिटी हा गृहनिर्माण प्रकल्प झाला आहे. तेव्हापासून दरवर्षीच पावसाळ्यात येथील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन चार महिने वास्तव्य करावे लागते.
ज्यावेळेला हा प्रकल्प झाला त्यावेळेला नैसर्गिक पाण्याचे निचर्याचे स्त्रोतच बंद केले गेले. मात्र तत्कालीन प्रशासकीय अधिकार्यांनी या बाबीकडे हेतुपुरस्कर कानाडोळा केला. तसं पाहता एखादा गृहनिर्माण प्रकल्प शहरात होत असेल तर पहिल्यांदा पाणी निचर्याची सोय काय आहे याची व्यवस्था नगरपालिकेने पाहयची असते. त्या नंतरच गृहनिर्माण प्रकल्पाला परवानगी दयायची असते. परंत प्रशासनाकडून पाहणी न करताच गृहनिर्माण प्रकल्पांना परवानग्या दिल्या जातात. हीच बाब उत्कर्षनगरच्या रहिवाशांच्या मूळावर आलेली आहे. बोरगाव रोडला केळकर वाडयाच्या शेजारी जे नव्याने बांधकाम सुरू आहे त्याठिकाणी तर नैसर्गिक पाण्याच्या निचर्याला योग्य प्रकारे मार्ग करून दिलेला नाही. त्यातच रिंगरोडच्या भरावामूळे देखील उत्कर्षनगरमध्ये नव्याने पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झालेली आहे. याबाबीकडे नगरपालिका प्रशासनाने योग्य प्रकारे लक्ष न घातल्यास येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या दोन दिवसात येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्याने लहान त्यांना लहान लेकरांना घेवून रात्र रात्र जागून काढावी लागत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष दयावयाचे आहे.
याविषयी नगरपालिकेचे मुख्याधिका जीवन पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी स्वतः उ त्कर्षनगर येथे जावून नक्की काय समस्या आहे ती पाहून घेतो.असे त्यांनी स्पष्ट केले.