भाजप रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते लग्न प्रकरणः महिलेची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचे बेडरुममधील व्हिडिओ प्रकरण ताजे असतानाच आता सोलापुरातील एका महिलेने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्या विरोधात केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाकडे केली आहे. दरम्यान सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता महेश देशमुख यांचा देखील राजीनामा घेणार का याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विवाहित असूनही घटस्फोट झाल्याचे भासवून या महिलेस महेश मोहिते यांनी संबंधित महिलेस तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून या महिलेसोबत लग्न केले, तसेच या महिलेपासून त्यांना एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिसऱ्या अपत्यामुळे राजकीय करिअर संकटात आल्यानंतर महेश मोहिते यांनी मुलीची ओळख लपवून ठेवण्यासाठी संबंधित महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यातून धमक्याही दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे सोलापुरातील या महिलेने ६ मे २०२२ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, माझा २०१५ मध्ये अलिबाग (जि. रायगड) येथील भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. त्यांनी आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांचा पत्नीपासून घटस्फोट झाल्याचेदाखविले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत ६ ऑक्टोबर २०१५ • रोजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
तक्रारीत त्या महिलेने म्हटले आहे की, माझ्यावर अत्याचार करण्यात आले. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली. मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धोका आहे. या महिलेने राज्य महिला

एप्रिलमध्ये आयोगाकडे केली तक्रार

दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेने रविवारी (दि. १७ जुलै) पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि सोलापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले, याबद्दल कळवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, या रायगड जिल्हाध्यक्षाचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचेसुद्धा या महिलेने सांगितले आहे, तसेच या वरिष्ठ नेत्यांमध्ये या महिलेने किरीट सोमय्यांपासून ते फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांचीच नावे घेतली आहेत.

Exit mobile version