| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालत असून, त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवून नावलौकिक वाढवावा, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महिला दिनानिमित्त आवाहन केले आहे.
शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या. महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहायला पाहिजे. महिला गट, तसेच ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांची उन्नती साधण्यात येत आहे. बचतगटांना तसेच ग्रामसंघांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्जपुरवठा तसेच अनुदान देण्यात येते. यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, असेही डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
महिलांनी आपले अस्तित्व सिध्द करायला पाहिजे. समाजात सुरू असलेल्या विविध विषयांबद्दल महिलांना माहिती असणे महत्वाचे आहे. विषयांमध्ये भाग घेणे, त्यावर आपली मते मांडणे यातुनच महिलांचे मत पुढे येऊन समाजात बदल होऊ शकतो. जितकी माहिती आहे, त्यातच समाधान न मानता महिलांनी सर्वंकषपणे विचार करावा, असे मत डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केले.
जो बदल आपण समाजात पाहतो, तो बदल आधी स्वतः मध्ये केला पाहिजे. महिला जागतिक विविध क्षेत्रात आपले स्थान कायम करीत आहेत. त्याचबारेबर महिला आजही आपल्या समाज हक्कासाठी भांडत आहे. शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक सुरक्षा महिलांच्या वाटचालीत अडथळे आणतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये महिलांनी आपली बाजू बळकट केली पाहिजे, असा सल्लाही डॉ. किरण पाटील यांनी दिला आहे.