। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब येथील मेन लाईनची केबल तुटल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गडब येथील मेन लाईनची केबल येथील येथील मुंबई-गोवा महामार्गावरील हनुमान मंदिराजवळील नाल्यातून टाकण्यात आली आहे. ही केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. दोन दिवस वीजवितरण कंपनीचे कर्मचारी, ठेकेदारांचे कामगार व गावातील ग्रामस्थांनी खंडित वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. दोन ठिकाणी केबल खराब झाल्याने अखेर तिसर्या दिवशी नवीन केबल आणण्यात आली. ती टाकण्यासाठी ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीच्या कर्मचार्यांना व ठेकेदारांचे कामगारांना सहकार्य करुन रात्री उशिरा खंडित वीजपूरवठा पूर्ववत सुरु करण्यात आला. गडब येथील मेन लाईनच्या केबलची पाहणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अभियंता उमाकांत सपकाळे यांनी सांगितले.