। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशातील जनता आधीच महागाईने होरपळलेली असताना, सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याचा संभ्रम नागरिकांत निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.
मात्र याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी खुलासा केला असून या वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमधील संभ्रम दुर झाला आहे.