डॉ तात्याराव लहाने यांचे प्रतिपादन
| कोर्लई | वार्ताहर |
रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे, मानवासाठी रक्ताची गरज जागोजागी भासत असते. रक्तदानाचे महत्व समाजाला कळून आल्याने आता रक्तदानाची चळवळ वाढली आहे. त्यामुळे रक्त संकलित करणारी शिबिरे होत असतात. तरीही मानवी जीवनात नेत्रदान आणि अन्य महत्वाच्या अवयव दानाची देखील मोठी गरज असल्याने अंधश्रद्धा न बाळगता भारतीय समाजात अशा अवयव दानाची चळवळ फोफावली पाहिजे असे प्रतिपादन नेत्ररोगतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी मंगळवारी (दि. 23) मुरूड येथे केले. मुरूड शहर शिवसेना उबाठा गटातर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एल. के. बी हॉस्पिटलमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी स्नेहा शेळके, सेजल घुमकर, प्रमोद भायदे, अनुजा दांडेकर, जहूर कादरी, नगमा खानजादा, आदेश दांडेकर, विजय सुर्वे, अजित गुरव, कीर्ती शाह, अरविंद गायकर, राशीद फहिम, बाळकृष्ण गोंजी, मुग्धा जोशी, चंद्रकांत अपराध आदी मान्यवर, पत्रकार उपस्थित होते. शिबिरात सुमारे 75 जणांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, प्रशांत कासेकर, विजय वाणी, यश माळी, कुणाल सतविडकर, रुपेश जामकर, अमित गोंजी, राहुल कासार, दीपाली जामकर, उत्कर्षा धोत्रे आणि अन्य शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल रणदिवे यांनी केले.
बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्यावर खूप प्रेम होते. त्यांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन मी केले होते. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या हा विचार आपण मनात आणला तरी अवयव दानाबाबतची अंधश्रद्धा दूर होऊन अवयव दानाची चळवळ आधिक जोमाने वाढेल.
डॉ. तात्याराव लहाने
नेत्ररोगतज्ञ