| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या उल्हासनगर चार उपविभागातील राधेश्यामनगर भागात सुजल घडपकर या युवकाचा अंघोळ करताना विजेचा धक्का बसून गुरुवारी (दि.22) मृत्यू झाला आहे. घरातील संचमांडणीतील तांत्रिक चुकीमुळे जिन्यात वीजप्रवाह उतरल्याने व या जिन्याचा स्पर्श झाल्याने संबंधित युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
सखोल तपासणीत सदोष वायरिंगमुळे हा अपघात घडल्याचे समोर आले. विद्युत निरिक्षकांच्या समक्ष प्रात्यक्षिकाद्वारे वस्तुस्थिती समोर मांडण्यात आली. घटनास्थळापासून जवळपास शंभर फूट अंतरावर विद्युत रोहित्र असून, हे रोहित्र जमिनीपासून दहा फूट उंचीवर डबल पोलवर बसवलेले आहे. घरातील तांत्रिक बिघाड व विद्युत सुरक्षेसाठी आवश्यक काळजी न घेतल्याने हा प्राणांतिक अपघात घडल्याचे दिसून आले आहे.