| अलिबाग | प्रतिनिधी |
पनवेलकडून अलिबागला जाणाऱ्या विनाथांबा एसटी बसमध्ये शनिवारी दुपारी कर्नाळा येथे बिघाड झाला. दरम्यान, एक तास उलटूनही पर्यायी बसची व्यवस्था केली नसल्याने एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून एसटी महामंडळामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. प्रवाशांना चांगली सेवा देण्याची प्रतिज्ञाही घेतली जाते. मात्र, ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे एसटी महामंडळाचा कारभार असल्याचे समोर आले आहे. अलिबाग आगारातून दुपारी विनाथांबा एसटी बस पनवेलकडे निघाली. कर्नाळा अभयारण्याच्या जवळ आल्यावर अचानक बस बंद पडली. एक तास होत आला तरीही बस सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ज्येष्ठ नागरिकांसह महिला, लहान मुलांना तासभर दुसऱ्या बसची वाट पाहावी लागली, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.