नोटीस बजावून केली कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत कोंडीवडे रस्त्याच्या बाजूने वाहणार्या उल्हास नदीच्या पात्रात बांधकाम केले जात आहे. त्या बांधकाम मुळे पावसाळ्यात परिसरात पूरस्थिती निर्माण होणार आहे. त्याविरुद्ध आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून तेथील सर्व बांधकाम थांबविण्यात आले आहे. सर्व बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे अशी नोटीस पाटबंधारे विभाग यांच्याकडून देण्यात आली, असून संबंधित बांधकाम तोडण्यात येई पर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा तक्रारदार यांच्याकडून निर्धार व्यक्त केला आहे.
कर्जत तालुक्यातील तमनाथ आणि आडिवली येथे उल्हास नदीपात्रात सर्व्हे नं 29/1 मध्ये गेले. अनेक दिवस मोठया प्रमाणात भराव आणि काँक्रिटची भिंत बांधकाम बेकायदेशीररित्या बांधण्यात येत आहे. त्या भिंतीमुळे पावसाळ्यात नदीचे पाणी समोरच्या गावांमध्ये घुसून नुकसान होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम पूरनियंत्रण रेषेत सर्व नियमांचे उल्लंघन करून नदीचा प्रवाह बदलत आहे. पूर्वी 150 मिटर लांबीचा असलेला हा प्रवाह आता भिंत बांधल्याने अर्ध्यावर येवून ठेपल आहे. त्याचां परिणाम पावसाळ्यात महापुराचा फटका आजूबाजूच्या 5 ते 6 गावांना बसून नदीचे पाणी घुसून शेतीची तसेच वित्तीय आणि जीवितहानी होण्याची शक्यता शेतकर्यांनी वर्तवली आहे. भिंती मुळे संभाव्य भीती लक्षात घेवून स्थानिक गावकरी शेतकरी संबधित विभागात तक्रार करून न्यायसाठी धाव घेतली होती. संबंधित बांधकाम आणि भराव तेथून काढून टाकण्यात यावे अशी मागणी घेवून गोगटे आणि स्थानिक शेतकरी यांनी उपोषणाची हाक दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेमुळे उपोषण करता येणार नाही. आपण अन्य मार्गाने प्रश्न मार्गी लावावा असे पत्र तहसीलदार यांनी दिले होते. कर्जत प्रेस असोसिएशन कडून या कामाबद्दल साखळी उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आली होती, आणि लगेच सर्व यंत्रणा कामाला लागली आणि लगेच बांधकाम बंद करावे, अशी नोटीस साईटवर जाऊन लावली आणि काम बंद केले.
मात्र, अनधिकृत बांधकामास राजकिय वरद हस्त असल्याने तहसीलदार आणि जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी गुणटूरकर यांच्याकडून पूरनियंत्रण रेषेत असून कोणतीही परवानगी दिलेली नाही. मात्र विना परवाना बांधकाम करण्यात आल्याने ते बांधकाम तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसे पत्र आणि नोटीस जमीन मालक यांना देण्यात आली आहे. संबंधित मालक यांच्यावर कारवाई आणि नदी पत्रात अनधिकृत झालेला भराव, बांधकाम त्वरित काढुन टाकण्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ने देखील साखळी उपोषण करण्याची परवानगी मागितली. असून उल्हास नदीच्या पात्रात झालेले बांधकाम आणि मातीचा भराव हटवण्याची मागणी कायम ठेवली आहे. सध्या केवळ बांधकाम बंद ठेवण्यात आले असून निवडणूक आचारसंहिता असे पर्यंत शासनाने ते बांधकाम सुर केले नाही तर साखळी उपोषण करण्याचा निर्धार कायम राहणार आहे असे अध्यक्ष भूषण प्रधान यांनी जाहीर केले आहे.