| नेरळ | प्रतिनिधी |
वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर नेरळ पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. प्रामुख्याने विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालक यांच्यावर या केसेस केल्या जात असून, रायगड जिल्ह्यात हेल्मेट विना वाहतूक करणारे दुचाकी चालक यांच्यावर कारवाई सुरू आहे.
नेरळ वाहतूक पोलिसांची वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रायगड पोलीस निरीक्षक आचल दलाल यांनी जिल्ह्यात अपघातमुक्त दुचाकी प्रवास संकल्पना घेऊन हेल्मेट वापरत नसलेल्या दुचाकी चालकांच्यावर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे. मोटार सायकलवर तीन सीट घेऊन जाणे, दुचाकीस्वार हेल्मेट न वापरणे, गाडी चालवण्याचे परवाना नसणे आदी कारणाने मोटर सायकल चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये अठरा वर्षाखालील मुले मोटार सायकल चालवताना भरधाव वेगाने चालवत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट न वापरल्यामुळे अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांनी आपले प्राण गमवावे लागले असल्याच्या घटना कर्जत तालुक्यात घडल्या आहेत. नवीन चार चाकी वाहनांना सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअरबॅग उघडत नाही आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी सीट बेल्ट लावले पाहिजे यासाठी देखील जनजागृती करण्यात येत आहे. या सर्व अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 1500 दंड आकारला जात आहे. हेल्मेट न वापरणे 1000 दंड आकारला जात आहे. तसेच तीन सीट घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वार यांच्यावर देखील वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. वाहतूक पोलीस नितीन अहिरे, निलेश गडाख यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत आहे. त्या-त्यावेळी वाहतूक पोलीस यांच्याकडून वाहतुकीचे नियम पाळण्याचे ही आव्हान करण्यात आले आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. दुचाकी स्वरांनी हेल्मेट वापरले पाहिजे, ट्रिपल सीट घेऊन आपण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात यासाठी रायगड पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.







