कमी वाहतूकीचे कारणदेत रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेचा प्रस्ताव नाकारला
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. लाखो पर्यटक अलिबागसह अन्य ठिकाणी फिरण्यास येतात. नोकरी व्यवसायसाठी देखील अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे अलिबागमध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, रेल्वेमंत्री यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. कमी वाहतूक असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प रद्द केला आहे. त्यामुळे अलिबागकरांचे रेल्वेचे स्वप्न भंगले आहे.
रायगड पर्यटन व औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. वर्षाला दहा लाखांहून अधिक पर्यटक अलिबागसह जिल्ह्यातील अनेक भागात येतात. सिनेस्टार, व्यावसायिक, क्रिकेटर आदी मंडळींकडून अलिबागमध्ये जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत. अलिबागहून बसने मुंबईला जाण्यासाठी चार तास लागतात. त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास कित्येक तास निश्चित स्थळी पोहचता येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका पर्यटक, स्थानिक व कामगार वर्गाला कायमच बसत आला आहे. अलिबागसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ- मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. नव्यानेदेखील प्रकल्प अलिबागमध्ये येऊ घातले आहे. तिसरी मुंबई म्हणून अलिबागकडे पाहिले जाणार आहे. त्यामुळे नोकरी व्यावसायिसाठी अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागांचा विस्तार वाढू लागला आहे. नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असल्याच फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसतो. त्यामुळे अलिबाग रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. रेल्वे व्हावी अशी अलिबागकरांची इच्छा होती. परंतु, रेल्वेचे स्वप्नच राहिले आहे.
अलिबागजवळ पेण ते थळ (26.41 किमी) पर्यंत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) चे खासगी रेल्वे साइडिंग अस्तित्वात आहे. कमी वाहतूक अंदाजे असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने अलिबाग रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द केला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात माहिती दिली की, हा प्रकल्प पुढे नेता येणार नाही, असे सांगितले.
रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देणे ही भारतीय रेल्वेची एक सतत आणि गतिमान प्रक्रिया आहे. रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोबदला, शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी, गहाळ दुवे आणि पर्यायी मार्ग, गर्दीच्या, संतृप्त मार्गांची वाढ, सामाजिक-आर्थिक विचार इत्यादी आधारावर हाती घेतले जातात. जे चालू प्रकल्पांच्या देणग्या, निधीची एकूण उपलब्धता आणि स्पर्धात्मक मागण्यांवर अवलंबून असतात. अलिबाग ते पेण (28 किमी) नवीन मार्गाच्या बांधकामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. परंतु, कमी रहदारीच्या अंदाजामुळे प्रकल्प पुढे नेता आला नाही.
त्याच मार्गावर कार्यरत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) च्या रेल्वे साइडिंगचा उल्लेख होता. मंत्रालयाने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आरसीएफला या मार्गावर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी संमती देण्याची विनंती केली होती, परंतु अद्याप ती मिळालेली नाही. अलिबागजवळ पेण ते थळ (26.41 किमी) पर्यंत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) चे खासगी रेल्वे साइडिंग आहे, जे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुले नाही. रेल्वेने आरसीएफला या मार्गावर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी संमती देण्याची विनंती केली आहे. 2019 आणि 2020 मध्ये अशा विनंत्या करण्यात आल्या होत्या. तथापि, आरसीएफने अद्याप संमती दिलेली नाही, असे वैष्णव म्हणाले.







