| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जंतरमंतरवर पुन्हा एकदा तरुणांनी एल्गार पुकारला आहे. चलो संसद हे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी (दि.22) पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगीच्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झाले. दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड करत राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याने वातावरण पुन्हा तापलं.







