| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राने ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी लढतीत तामिळनाडूला 39-30 असे पराभूत करीत या गटात अव्वल येत बाद फेरी गाठली. हरियाणा येथील चरखी- दादरी येथील बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 69व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रासह गतविजेता भारतीय रेल्वे, बिहार, सेनादल, दिल्ली, गोवा, राजस्थान, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, केरळ, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, पंजाब यांनी बाद फेरी गाठली.
महाराष्ट्राने साखळीतील शेवटच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली. अस्लम इनामदार, आकाश शिंदे यांनी आपल्या चढाईतीळ आक्रमकतेला संयमाची जोड देत संघाला गुण मिळवून दिले. कप्तान शंकर गदई, किरण मगर यांनी बचाव भक्कमपणे सांभाळत व योग्य वेळी पकडी करीत उत्तम कामगिरी केली. पूर्वार्धातच या खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने दोन लोण देत 26-19 अशी आघाडी आपल्याकडे राखली होती. उत्तरार्धात संयमाने खेळ करीत सामना संथ केला आणि 9गुणांनी आपल्या सलग तिसर्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अस्लमने चढाईत 9 गुण टिपले, तर पकडीत 3 गुण असे 12 गुण वसूल केले. आकाशने 1 बोनससह 7 गुण असे 8 गुण मिळविले. शंकराने 3, तर किरणने 2 पकडी यशस्वी केल्या. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राची लढत आता केरळ संघाशी होईल. इतर सामन्यांचा निकाल संक्षिप्त.