सरकार वेळेवर निर्णय घेत नाही
| मुंबई | वार्ताहर ।
प्रकल्प आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिलं पाहिजे, सरकार वेळेवर निर्णय घेत नाही,अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी मुंबईत असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.
बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणार्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करत येईल, असं गडकरी म्हणाले.