मच्छिमारांच्या दुष्काळात आशेचा किरण
। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे ।
मच्छिमारीचा हंगाम १ ऑगस्टला सुरु झाला. परंतु निसर्गाचे चक्र फिरले आणि समुद्रात वादळ आणि पाऊसाने थैमान घातले सोनेरी हंगामासाठी गेलेल्या बोटी पुन्हा किनारी आल्या बोटीचा डिझेलचा खर्च देखील सुटला नाही. असे ३ हंगाम फुकट गेल्यावर आता नवरात्रात समुद्रातील कोळंबी किनारी आली असल्याने मुरुडच्या सर्व बोटी आज सकाळपासून किनाऱ्यावर मासेमारी करताना दिसत आहे. आज सर्व बोटींना मोठ्या प्रमाणात कोळंबी मिळत आहे. असे वर्षातील नेमकेच दिवस असतात त्यावेळी कोळंबी मासळी संपूर्ण कोकण किनारपट्टीत येते. आज श्रीवर्धन, दाभोळ, रत्नगिरी,अलिबाग, याठिकाणी कोळंबी किनाऱ्यावर आलेली निदर्शनात आली आहे.
कोळंबी चा हंगाम मच्छिमारांना फायदेशीर ठरतो. कारण पाऊस परतीच्या मार्गावर असताना कडक उन्हाळा सुरु होतो. ऑक्टोबर हिट कोळंबी सोलून सुकवण्यासाठी अतिशय उपयोगाची ठरते. कोळंबी सुकवून सोडे बनवण्याच्या प्रक्रियेत रायगडातील महिला कामाला लागतात. आज सोड्याचा भाव २२०० किलो असल्याने हंगामात जास्तीती जास्त कोळंबी सुकवतात ,वर्षाचा नफा ह्या काहीदिवसात मिळतो. पुढे दिवाळी पर्यटकांचा हंगाम असल्याने दिवाळीत सोड्याची मागणी मोठया प्रमाणात वाढते. आणि मुरुडच्या सोडे प्रसिद्ध असल्याने मुरुडला आलेला पर्यटक हनुमानाचे खाजे व कोळीवाड्यातील ताजे सोडे घेतल्याशिवाय जात नाही.
ऑक्टोबर हिट सुरूहोते आणि शेतात भात पिकायला सुवात होते. तशी कडक उन्हाचा योग्य वापर होण्यासाठी नवरात्र हंगामात कोळंबी मिळणे गरजेची असते. आज हंगाम सुरु असल्याने कोळी खुश आहे. कोळी महिलांच्या चेहऱ्यावर हसू दिसू लागले. या हंगामाची कोळंबी किनाऱ्यावर मिळत असल्याने बोटींचा डिझेल खर्च कमी होतो. नवरात्र उपास सुरु असल्याने कोळंबी फारशी विकली जात नाही, म्हणूनच कोळंबीच्या सोडे बनवण्याची प्रक्रियेला वेग येतो. किनाऱ्यावर कोळंबीचे ३ फुटाचे ढिगारे असल्याने उपसत खाणाऱ्या खवैयांसाठी सुगीचे दिवस आलेत.