| मालवण | दिलीप जाधव |
नवसाला पावणार्या आई भराड़ी देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने आंगनेवाडीमध्ये सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्सव साजरा केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नारळ फोडण्यात आला. तळकोकणवासियांनी प्रदुषणवाढीचा धसका घेतलेल्ल्या रिफायनरीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा धुमशान सुरु होणार अस दिसतेय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ग्रीन रिफायनरी च्या माध्यमातून 3 लाख कोटी रुपयांची भारतातील सर्वात मोठी गुंतवणुक येणार आहे. मात्र शिवसेना यावर राजकारण करत आहे. लोकांना भड़कविण्याचे उद्योग सुरु आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेचा विरोध पाहून केंद्रसरकारने ग्रीन रिफाइनरी राज्यामध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आमचे राज्य आल्याबरोबर त्वरित केंद्र सरकारला पत्र लिहून ग्रीन रिफाइनरी कोकणातच सुरु करण्याचा आग्रह धरला आहे,असा दावाही उपमुख्यमंत्र्यांनी केला. यामुळे पुढील 20 वर्षात अर्थव्यवस्था भक्कम होईल, त्याच बरोबर फाईव्ह स्टार होटेल झाल्यास परदेशी पर्यटकांचा ओघ सुरु होईल असे ते म्हणाले.
तळकोकणातील एरोंन नाणार, आणि आता रिफायनरीसाठी शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने गुजरात ,मुंबईच्या धनाडयांनी विकत घेतल्या आणि सरकारला मोठ्या किंमतीत विकल्याचा आरोप कोकणवासीय करतात प्रकल्प येऊन सुद्धा कोकणातील शिकललेल्या तरुण – तरुणीना मुंबई, दिल्ही, गुजरात मध्ये रोजगारा साठी जावे लागते असा आरोप केला जातो. यावेळी नारायण राणे, आशिष शेलार आदींची भाषणे झाली. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काजूच्या बोंडा वर प्रक्रिया करून ईथिनोल तयार केल्यास काजू उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फायदा होईल तसेच काजू च्या बोंडुला 1रुपया ऐवजी 5 रुपयाचा भाव दिला पाहिजे अशी मागणी केली.