| चिरनेर । वार्ताहर ।
तालुक्यातील सर्वच भागांत मंगळवारी (ता. 21) पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकर्यांच्या भाजीपाला, टोमॅटो व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. टोमॅटो लागवड क्षेत्रात संपूर्ण पाणीच पाणी झाल्याने विक्रीस तयार असलेले टोमॅटो खराब झाले आहेत. लागवडीवर केलेला खर्च वाया गेला आहे. तर वीटभट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.