। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनच्या वतीने पुकारलेल्या आमरण उपोषणाच्या अनुषंगाने गुरुवारी रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात उपोषणकर्त्यांसमवेत जिल्हा प्रशासनाने चर्चा करुन विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा संजय वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, सुनील वाघमारे, संतोष घाटे, खालापूर गटविकास अधिकारी बालाजी पुरी, पेण गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी पाटकर, खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी पवार, काळया कडू, सोमा शिद यांच्यासह आदिवासी प्रतिनिधींच्या बैठकीत जल जीवन मिशन मधून मंजूर झालेल्या सर्व आदिवासी वाड्यांमध्ये जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, ठेकेदार स्थानिक पाणीपुरवठा समिती आणि ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य वाड्यांमध्ये बैठक घेऊन अंदाजपत्रक वाचन आणि आदिवासी बांधवांच्या सूचना घेऊन काम करतील, असे सांगितले.
ग्रुप ग्रामपंचायत दूश्मी – खारपाडा मधील वडमांलवाडीसाठी तात्पुरती उपायोजना म्हणून ठक्कर बाप्पा योजनेतून नळ जोडणी करण्यात येईल आणि एप्रिल महिन्यापर्यंत वडमालवाडी आदिवासी ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे सिडकोच्या जलवाहिनीतून उद्भव स्रोत घेऊन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येईल व रस्त्यासाठी दहा लाख रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे पुढील आठ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.पेण तहसीलदारांनी बोरगाव ग्रामपंचायतमध्ये तांबडी ठाकूरवाडी खऊसावाडी, उंबरमाळ काजूची वाडी आणि केळीची वाडी या पाचही पाचही वाड्यांच्या समावेश करून प्रभाग रचना केलेली आहे त्यास आदिवासी बांधवांनी विरोध दर्शवला असून जोपर्यंत पाचही वाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याही ग्रामपंचायतमध्ये सहभागी करून घेऊ नये असे सांगितल्यानंतर डॉक्टर किरण पाटील यांनी बिडीओ भाउसाहेब पोळ यांना तात्काळ स्वतंत्र ग्राम पंचायतीच्या प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले वन हक्क अधिनियम 2006 चा कलम 3 (1) नुसार पाचही वाड्यांचे वैयक्तिक वन हक्क दावे बोरगाव आर एफ ओ पेण यांच्याशी समन्वय साधून तात्काळ करण्यात यावे म्हणजे या वाड्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येईल असे आदेशित केले आहे तांबडी ठाकूरवाडी खऊसावाडी, उंबरमाळ काजूची वाडी आणि केळीची वाडी या पाचही वाड्यांची जि प ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे पेण शाखा अभियंता प्रत्यक्ष वाड्यांची भेट देऊन ठेकेदार आणि पाचवी वाड्यांच्या आदिवासी बांधवांसोबत बैठक घेऊन जल जीवन मधून मंजूर एक कोटी 26 लाख रुपयांचे एस्टिमेट समजावून सांगून आदिवासी बांधवांना विश्वासात घेऊन तात्काळ कामास सुरुवात करतील. उंबरवाडीच्या रस्तासाठी तीस लाख रुपयांच्या निधीस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगर वाड्याचा थांबवलेल्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काजूची वाडी रस्ता तयार करण्यासाठी दहा लाख रुपये तांबडी आदिवासी वाडी दहा लाख रुपये वरची तांबडी रस्ता तयार करणे आठ लाख 86 हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून पुढील आठ दिवसात काम वाटप करून तिनेही हाडांच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल. पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आपटा हद्दीतील कोरलवाडी आदिवासी वाडीसाठी दहा लाख रुपये आणि टोकाची वाडी आदिवासी वाडीसाठी पाच लाख रुपये रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.