9.75 कोटी लाभार्थ्यांना मदत
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी सरकारच्या पीएम-किसान योजनेअंतर्गत 9.75 कोटी लाभार्थी शेतकर्यांना सुमारे 19,500 कोटी रुपये हस्तांतरित केले. सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांचे नऊ हप्ते दिले आहेत. रक्कमेचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील या योजनेच्या लाभार्थी शेतकर्यांशी संवाद साधला.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. या योजनेची घोषणा 2019च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मदतनिधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीतया व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे हा निधी वितरित करण्यात आला.