मुंबई | प्रतिनिधी |
कोरोनाचा कहर आपण दोन्ही वर्षी अनुभवला आहे. शिथिलता दिली असली तरी नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन लागू शकेल. लॉकडाऊन नको असल्यास सर्वांनी खबरदारी घेतली तर आपण त्यातून नक्कीचं बाहेर पडू,अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यात रविवारी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहम करण्यात आले.यावेळी बोलताना स्वातंत्र्याचा इतिहास फक्त लक्षात ठेवून आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची जपणूक करणं आपली जबाबदारी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोरोनातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.सोमवारपासून आपण अनेक बंधनांमध्ये शिथिलता आणली आहे. पण कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी पुन्हा कोरोना संकट उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये म्हणून आपल्याला खबरदारी घ्यायची आहे.
उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री