घरगुती बनवलेले जिवामृत, सेंद्रिय खतांचा वापर
| नेरळ । वार्ताहर ।
तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत मधील माले या गावातील आदर्श शेतकरी अरुण वेहले हे मातीशी एकरूप झालेले शेतकरी आहेत. वर्षभर वेगवेगळी पिके घेणारे म्हणून त्यांची ओळख असून हंगामानुसार पिके घेणारे म्हणून त्यांची ओळख असून त्यांना अन्य शेतकरी मातीतील शेतकरी म्हणतात. सर्व पिके सेंद्रिय खते वापरून केली जात असल्याने भाज्या आणि पालेभाज्या यांना अधिक भाव मिळतो.
माले या साळोख ग्रामपंचायतमधील गावातील अरुण वेहले हे शेतकरी सतत नाविन्यपूर्ण करीत असतात.त्यात तेथील वाहणार्या उन्हाळ्यात कोरड्य असलेल्या पोश्री नदीमधील पाणी उचलून शेती करतात. पावसाळ्यात आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या माळरानावर शेती करतात तर उन्हाळयात पोश्री नदीच्याकडेला असलेल्या शेत जमिनीत शेती करतात. आपल्या शेतीमधून विविध प्रकारची शेती करणारे अरुण वेहले यांच्याकडून सर्व प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते.
त्याचवेळी पालेभाज्या यांची शेती करून दररोज सकाळी माल काढायचा आणि नेरळची बाजारपेठ गाठून त्या भाज्यांची तसेच पालेभाज्या यांची विक्री करायची असा त्यांचा प्रयत्न असतो. तर वेगेळ्या प्रकारची कडधान्य देखील ते आपल्या शेतीमधून घेत असतात. सर्व पिके ते केवळ शेण खात आणि सेंद्रिय खाटनाच वापर करून घेतात. त्यामुळे त्यांची विक्री करताना सेंद्रिय खते यांच्या माध्यमातून पिकविलेल्या या शेतीमधील मालाला देखील अधिक भाव मिळतो.
वेहले हे अनेक वर्षे आपल्या शेतीमधून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि कडधान्य तसेच,हळद यांचे उत्पादन घेत असतात. तर मुळा, वाल, चवली, हरभरा, मुग, उडीद, पपई, शेवगा, सुरूंग, हळद, नाचणी हि सर्व पिके घेण्यासाठी घरगुति बनवलेले जिवामुत, किटकनाशक अशी सेंद्रिय खते वापरत असतात.