बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात कोपरखैरणे वाहतूक शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत केलेल्या कारवाईत गेल्या दीड महिन्यामध्ये 3,247 वाहन चालकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे.कोपरखैरणेमध्ये रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क केली जात असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्याचप्रमाणे अनेक वाहन चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करण्याबाबतच्या तक्रारी मिळाल्यानंतर कोपरखैरणे वाहतूक शाखेने नियम मोडणार्‍यांविरोधात 1 जानेवारीपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. यावेळी तब्बल 3,247 वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आला असून लाखोंचा दंड वसूल केला आहे.

Exit mobile version