अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण २ अंतर्गत भारताच्या ७५ व्या स्वातंत्रय दिनांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्लास्टिक संकलनासाठी क्लिन इंडिया ही मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रूरल यंग फाऊंडेशन, रायगड जिल्हा परिषद पाणी स्वच्छता कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.२३) अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी मोहिमेत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख निशांत रौतेला, रूरल यंग फाऊंडेशनचे सुशील साईकर, माणुसकी प्रतिष्ठान वायशेत, रोटरी क्लब अलिबाग, जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार सहभागी होते. यावेळी अलिबाग शिक्षक कला मंच यांच्या वतीने स्वच्छता विषयक पथनाट्याचे सादरीकरण व स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.