। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रायगडच्या कलावंतांची निर्मिती असलेल्या हरिओम चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ यांनी निरुपणकार,पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. चित्रपटाचा प्रोमो पाहून त्यांनीही सर्व टीमचे कौतुक केले. आक्रमकता, धाडस, शौर्य , साहस आदींचा मिलाप हरीओमच्या अभिनयातून दिसून येतोय. या चित्रपटातील कलाकारांनी जीव ओतून भूमिका साकारल्या आहेत. ज्या भूमिका अभिनय नसून खर्या वाटत आहेत. दमदार कथा, पटकथा, संवाद, चित्रीकरण, अभिनय, उत्तम कलाकार, संगीत, तसेच प्रत्येक कलाकारांच्या तोंडी शोभतील असे संवाद यामुळे चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरेल. आपल्या मेहनतीचे फळ आपणास मिळेल, असे धर्माधिकारी यावेळी म्हणाले. हरिओमच्या टीमने धर्माधिकारी यांची शुभेच्छापर भेट घेतली व चित्रपटाची थीम सांगितली. यावेळी अभिनेता हरिओम घाडगे, गौरव कदम,वंदना मोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदू मयेकर, बाबू पार्टे ,सचिन कदम आदींसह मान्यवर उपस्थित होते.