। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सुकन्या कांचन विद्याधर जाधव-लांजेकर यांना महाराष्ट्र राज्य रणरागिनी महिला सोशल फाउंडेशन या सामजिक संस्थेचा स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून नुकताच तासगावच्या उपविभागिय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. या संस्थेच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त साहित्य, लेखन व निवेदन या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.