| पुणे | प्रतिनिधी |
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी दिली तर आपला त्याला पाठिंबाच असेत,असे विद्यमान खा.गिरीश बापट यांनी म्हटले आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात त्यांनी हे भाष्य केले. राजकीय पक्षाची उमदेवारी कोणाला द्यायची याचा निर्णय प्रमुख नेते घेतात. त्यासाठी एक यंत्रणा असते, अध्यक्ष असतात, निवडणूक मंडळ असते. मात्र, संघटनाच राजकीय पक्षाचा उमेदवार ठरवू लागल्या तर पेच निर्माण होऊ शकतो. त्यांचा रोख अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडे होता. या संघटनेने योग्य आणि अयोग्य बघून कोणाचा प्रचार करायचा, याचा निर्णय घ्यावा. पण देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यास मला कोणतीही अडचण नाही. उलट फडणवीस पुण्यातून उभे राहिल्यास मला आनंदच होईल, असा गिरीश बापट यांनी म्हटले.