| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील एकमेव अशा पिरवाडी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मेरिटाईम बोर्डाकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून पर्यटकानांही नवा पर्याय मिळणार आहे. उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर शनिवार, रविवार पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. उरणमधील हा किनारा जरी छोटासा असला तरी या किनारपट्टीवरील शुद्ध हवेत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशातच सध्या दिवाळीमुळे शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच अनुषंगाने मुंबईच्या धर्तीवर या किनाऱ्यावर उच्च दर्जाच्या राहण्याखाण्याच्या सुविधा असलेले हॉटेल्स उभी केली जाणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्याप्रमाणे आता पर्यटकांची पावले आता पिरवाडीकडे वळू लागली आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून पर्यटक उरण पिरवाडी किनाऱ्यावर एक दर्गा आहेत. या दर्ग्यावर मुंबई, ठाणे व नवी मुंबईसह इतर ठिकाणाहून भाविक येतात. यातील बहुतेक पर्यटक रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे सध्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.