प्रदीप म्हात्रे
रायगडचे भाग्यविधाते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राचा वारसा चालविण्याचे काम शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे समर्थपणे करीत आहेत.
शेकाप म्हणजे श्रमजीवी, कष्टकरी जनतेचा हक्काचा बुलंद आवाज. राज्यस्तरावर प्रा. एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लालबावटा खांद्यावर घेत श्रमजीवी वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच कार्याचा वसा आता आ. जयंत पाटील हे आपल्या सहकार्यांसह प्रामाणिकपणे चालविताना दिसत आहेत. श्रमजीवी, कष्टकरी, शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणसांचे प्रश्न चळवळीच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने करणार्या शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, ते म्हणजे जयंत पाटील होय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी राज्यातदेखील आजही अनेक सामान्य श्रमजीवी, कष्टकरी माणसांचे विविध अंगाने आज वस्त्रहरण होत आहे. मग तो सेझ प्रकल्प असेल, अगर डोलवी एमआयडीसी, अशा प्रकारे शेतकर्यांना निराधार, भूमीहीन, दिशाहीन करण्याचे काम शासनाच्या चुकीच्या धोरणाने भांडवलदार व शासन यांच्या संगनमताने पेण रायगडसह आज पूर्ण महाराष्ट्रात होत आहे. एक जागरुक लोकप्रतिनिधी व कर्तृत्ववान आमदार म्हणून ज्यांनी चळवळीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देऊन सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली.
डोलवी येथील एमआयडीसीमध्ये शासन तथा राज्यकर्ते चुकीच्या पद्धतीने शेतकर्यांच्या जमिनी घेऊ पाहात असताना, शेतकर्यांच्या मदतीसाठी कुणी नेता पुढे येत नव्हता. त्यावेळी शेतकर्यांना आठवले ते म्हणजे कुळ कायद्याचे जनक. स्व. ना.ना. पाटील (आप्पासाहेब) यांचे नातू जयंत पाटील. आम्ही शेतकर्यांनी भाईंना साद घातली. भाईंनीदेखील आमच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि डोलवी एमआयडीसीच्या लढ्याचे नेतृत्व स्वीकारले. मग जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयावर मोर्चा असेल, गावबैठका असतील, अथवा पेण प्रांत कार्यालयावरील धरणे आंदोलन असेल. सर्व ठिकाणी शेतकर्यांच्या अगोदरच जयंत पाटील हजर असायचे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चासाठी ‘ना भुतो, ना भविष्य’ अशी शेतकर्यांनी हजेरी लावली. आणि, त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या मर्जीशिवाय एक इंचदेखील जागा एमआयडीसीसाठी द्यायची नाही. त्यांनी विधिमंडळातदेखील एमआयडीसीचा प्रश्न लावून धरला. ज्या धनदांडग्यांनी शेतकर्यांना फसवून कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या होत्या, त्यांच्यासाठी सरकारला कायदा करायला लावला आणि जेव्हा केव्हा जमिनी विकल्या जातील, त्यातील 50 टक्के हिस्सा हा मूळ शेतकर्यांना देण्यात यावा. अशा प्रकारे नियम करायला लावला.
आ. जयंत पाटील यांनी केलेले कार्य हे आम्हा शेतकर्यांसाठी लाख मोलाचे आहे. त्यांचे हे उपकार आम्ही शेतकरी कधीच विसरू शकत नाहीत. जयंत पाटील नसते तर एवढ्याला केव्हाच दबाव तंत्र वापरून शेतकर्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या असत्या. म्हणूनच सामर्थ्य सह्याद्रीचे असले तरी कर्तृत्व हिमालयाएवढे असणारे कर्तृत्ववान आमचे मार्गदर्शक भाई जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
सेवेसाठी तत्पर आहे
देवावर भक्ती आहे
जीवनामध्ये शिस्त आहे
चारित्र्य शुद्ध आहे
बुद्धीमध्ये विवेक आहे
हृदयामध्ये करूणा आहे
मातृभूमीवर प्रेम आहे
मानवता हेच कुळ आहे