| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
ग्रुप ग्रामपंचायत उसरोली अंतर्गत मौजे वडघर येथे जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली आहे. सदर योजनेचे भूमिपूजन उसरोली सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच महेश कुमार नाना पाटील, स्वप्नेश नाखवा, नथुराम शेडगे, संतोष नाक्ती, उमेश माळी, विक्रम वाघमारे, मंगेश रोटकर, सुनील माळी, सुरेश रोटकर, रमेश भेर्ले, जितेंद्र भेर्ले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
वडघर भागात मोठ्या संख्येने आदिवासी लोक रहात असून आता त्यांची पाणी टंचाई संपुष्ठात येणार आहे. सुमारे 30 लाख रुपये खर्च या योजनेमधून होणार असून प्रत्येकाला नळ कनेक्शन सुद्धा उपलब्ध होणार आहे. वडघर येथे पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पाठपुरावा केला होता. रायगड जिल्हा परिषदेकडून योजनेला मंजुरी मिळताच सदरील कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सरपंच नांदगावकर यांनी सांगितले की, वडघर येथे पाणी टंचाई होती. परंतु सदरची योजना मंजूर झाल्याने पाणी टंचाई संपुष्ठात येऊन सर्व समाजाला मुबलक पाणी मिळणार आहे. सदरचे काम तातडीने पूर्ण करण्याचा माझा मानस असून लोकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. सदरील कार्यक्रमासाठी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.