| वेनगाव | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील शिरसे गावातील एका शेतकर्याच्या गाईवर बिबट्या ने हल्ला केल्याने त्यात गाईचा मृत्यू झाला.
शेतकरी निखिल दत्तात्रय देशमुख यांनी आपल्या जवळील असणारे चार गाई व एक बैल असे पाच गुरांना जंगलात चरण्यास सोडले असता संध्याकाळी पाच गुरांपैकी चार गुरे घरी आली व एक गाय आली नाही, म्हणून निखिल देशमुख गाईला शोधण्यासाठी शुक्रवार रोजी डोंगरावरील जंगलात गेले. जंगलात गाईचे शोध घेत असता एका ठिकाणी आपल्या जवळील गाय तिच्यावर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने ती मृत्यू अवस्थेत सापडली. देशमुख यांनी लगेच कर्जत वनविभागाला झालेली घटना कळवली असता वणविभागाचे वनपाल रघुनाथ कोकाटे हे आपल्या काही वनकर्मचार्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी गेले. तिथे मृत्यू गाईच्या शेजारी वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे दिसून आल्याने हे पायाचे ठसे हे बिबट्या जातीच्या वाघाचे असल्याचे असे निर्दशनास आले.
सदर गाईवर बिबट्याने हल्ला केला, सदर गाय त्यात मृत्यू झाली व निखिल देशमुख यांचे नुकसान झाले असल्याचा पंचनाम्यात नमूद करून वनविभाग कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आपली लहान मुले, पाळीव प्राणी, रात्रीच्या वेळी एकटे सोडू नये, तसेच रात्रीच्या वेळी फटाके लाऊन आवाज करीत रहा, जेणे करून फटाक्यांच्या आवाजाने वनातील हिश्रप्राणी गावापासून दूर राहतील असे सतर्क राहण्याचे आवाहन कर्जत पश्चिम वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समीर खेडेकर यांच्या कडून करण्यात आले आहे.