अमित शाहांचा थेट हल्लाबोल; भाजपच्या ’मिशन मुंबई’ला सुरुवात
। मुंबई । प्रतिनिधी ।
राजकारणात धोका सहन करु नका, जे धोका देतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, मुंबईच्या राजकारणात भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे. आम्ही शिवसेनेला लहान केलं नाही, शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली, खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली, असा थेट हल्लाबोल अमित शाह यांनी ठाकरेंवर केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने सोमवारी (दि.5) मुंबई दौर्याचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.
बीएमसी निवडणुकांसाठी भाजपने ’मिशन मुंबई’ला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ’मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी शाहांनी 135 जागा जिंकण्याचा नारा दिल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मिशन 135 ची घोषणा केली. ’मेघदूत’ बंगल्यावर भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, याशिवाय नितेश राणे, अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा आदि नेते उपस्थित होते.
फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने 2014 मध्ये युती तोडली. शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, असंही शाह म्हणाले.