| पनवेल | वार्ताहर |
चौघांनी केलेल्या मारहाणीत 29 वर्षे इसम जखमी झाला आहे. आरोपींविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयहिंद अर्जुन विश्वकर्मा हा पनामा कंपनी येथे नोकरीसाठी गेला होता. या ठिकाणाहून तो पडघामार्गे पायी चालत कळंबोली बाजूकडे येत होता. त्याने एक रिक्षा थांबवली. या रिक्षेतून बसून तो पुढे आला. मात्र, ती रिक्षा वाशी येथे जाणार असल्याने त्याने कळंबोली सर्कल येथे सोडतो असे सांगितले. यावेळी रिक्षाचालक व रिक्षात असलेल्या तीन इसमांनी त्याच्याशी वाद सुरू केला. त्यानंतर कळंबोली सरकलकडे येत असताना जयहिंद रिक्षाच्या खाली उतरला. यावेळी रिक्षाचालक व त्याच्यासोबत असलेल्या तीन इसमांनी जयहिंद याच्याशी भांडण केले व रिक्षात असलेल्या लोखंडी रॉडने त्याला मारहाण करुन जखमी केले.