संघटना नेते बरगे यांचा आरोप
| कर्जत | प्रतिनिधी |
एसटी संप प्रकरणी राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान, वेतनासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या शिफारसीला हरताळ फासला असल्याची टीका एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी कर्जत येथे केली आहे. कर्जत एसटी आगराच्या परिसरात संघटनेच्या नाम फलक अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी मुकेश सुर्वे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी विभागीय अध्यक्ष अंजुम काझमी, सचिव संभाजी मोरे, काँग्रेस जिल्हा प्रतिनिधी संदीप सोनटक्के, नेरळ शहर युवक काँग्रेस अध्यक्ष यतीन यादव, संघटनेचे आगार अध्यक्ष शशिकांत शिंदे, सचिव किरण भोईर आदी उपस्थित होते. कमलाकर किरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुखदेव सांगळे यांनी प्रास्ताविक केले.
या संदर्भात न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालात एसटीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने चार वर्ष कर्मचार्यांच्या वेतनासाठी शासनाच्या अर्थ संकल्पात तरतुद केली जाईल.पण अवघ्या काही महिन्यातच सदरच्या अहवालातील शिफारशीला हरताळ फासण्यात आला. दर महिन्याला वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात पण काही महिने त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली.पण गेल्या तीन महिन्यात प्रत्येक महिन्याला केवळ 100 कोटी रुपये शासनाने एसटीला दिले आहेत. याचाच अर्थ 1080 कोटी पैकी फक्त तीनशे कोटी रुपये एसटीला मिळाले आहेत.त्या मुळे काही कर्मचार्यांना वेळेवर वेतन मिळाले नाही व मनस्ताप झाला व न्यायालयाचा अवमान देखील झाला आहे.फ असेही बरगे यांनी स्पष्ट केले.
दिवाळी तोंडावर आली असल्याने दिवाळी साठी कर्मचार्यांना महागाईचा विचार करून दिवाळी भेट दिली पाहिजे व 34 टक्के महागाई भत्ता फरक सहित मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. संभाजी मोरे यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी जाकीर पेन्शनर , विठ्ठल गरजे, रामसिंग देवरे, भारत दातीर, सुरेश अडसूळे, संभाजी दौंड, यशवंत चव्हाण, सचिन कांबळे, रामचंद्र खोडका, अशोक दूधसागर, योगेश पवार, हरिश्चंद्र देशमुख, सुनील खंडागळे, किशोर खडवी, विशाल खेळुकर, दिनकर सोंडे आदींसह एसटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.