। पाताळगंगा । वार्ताहर।
वातावरणात सातत्याने गारवा निर्माण होत असल्यामुळे रायगडात सर्वत्र जोरदार थंडी पडू लागली आहे.दुपारी एक – दोन वाजेपर्यंत थंड वातावरण निर्माण राहते. पहाटे थंडी आणी धुके यांच्या मुळे वाहन चालकांस वाहन धीम्या गतीने चालवावी लागत आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके असल्यामुळे समोरील वाहनांचा अंदाज घेणे कठीण जात होते.वातावरणात सातत्याने बदल घडत असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असले तरी सुद्धा नागरिक या गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे.
सकाळी वातावरणात धुके आणी सायंकाळ झाली का जोरदार थंडी पडत आहे.तसेच पहाटे या धुक्यातून वाट काढले वाहनचाकांस अवघड जात आहे.धुके निर्माण झाल्यामुळे,बळीराजाला दिलासा मिळाला आहे.शेतात लावलेल्या कडधान्ये यांना पोषक द्रव्ये मिळत आहे.तालुक्यातील शेतकरी वर्ग पावसाळी भात शेती करीत असली तरी हिवाळी कडधान्ये पिके घेत असतात. शेतकरी वर्गांचा उदार निर्वाह शेतीच्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नातून होत असतो.या पिंकासाठी जास्त पाणी लागत नाही.मात्र हिवाळ्यात धुक्यांनी ही पिके जोमाने वाढत असतात.मात्र गेले काही दिवस थंडी आणी धुक्याने कसर भरून काढली असल्याचे सर्वत्र ठिकाणी अनुभवाला मिळाले.गेले अनेक दिवस पडलेल्या धुक्यामुळे सर्वत्र ठिकाणी वाहतुकीची कोंडी समवेत वाहन धीम्या गतीने सुरूच होती. शिवाय नियोजित वेळेवर पोहचण्यास अडथळा निर्माण झाला होता.