मृत अधिकार्‍यांच्या वारसांना अनुकंपा

मुंबई | प्रतिनिधी |
सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचार्‍याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आता गट अ आणि गट ब मधील अधिकार्‍यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला या निर्णयामुळे राज्यातील अधिकार्‍यांच्या निधनामुळे ओढवणार्‍या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version