। मुंबई । प्रतिनिधी ।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याने मविआमधील काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. यावर काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला विधान परिषदेत सभागृह नेतेपदाचं, विरोधी पक्षनेतेपदाचं स्थान मिळालयला हवं होतं. मात्र, चर्चा न होताच परस्पर हा निर्णय झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे काँग्रेसमध्ये याची प्रतिक्रिया आहे.
संजय राठोडांना मंत्रीमंडळात घेण्यावरूनही चव्हाणांना प्रश्न विचारण्यात आला. मंत्रीमंडळात कुणाला घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही हा सर्वस्व निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. हे दोन पक्षाचं सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच यावर अधिक स्पष्टीकरण देऊ शकतील. भाजपामधीलच काही लोकांनी त्यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. त्यावर अधिक स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ शकतील, असं मत चव्हाणांनी व्यक्त केलं.