| अलिबाग | विशेष अलिबाग |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संविधान जागर समिती, अलिबागच्या वतीने नफरत छोडो-संविधान बचाओ अशी ललकारी समस्त नागरिकांना देत शनिवार (दि. 26) अलिबाग येथे संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी नफरत छोडो संविधान बचाओ, या अभियानाची देखील सुरुवात होणार आहे, अशी माहिती अरविंद निगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बी.जी. पाटील, प्रा.डॉ. प्रेम आचार्य, दादासाहेब खंदारे उपस्थित होते.
सकाळी 10 ते 1 या कालावधीत ही यात्रा निघेल. अलिबाग शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून यात्रेला सुरुवात होईल. हिराकोट तलाव, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे पोहोचेल. तेथे होणार्या सभेने यात्रेची सांगता होईल.
दि. 26 अलिबाग येथून नफरत छोडो संविधान बचाओ अभियानाला सुरवात होणार असून या अभियानाची सांगता 3 डिसेंबर रोजी होईल, अशी माहिती अरविंद निगळे यांनी यावेळी दिली. डॉ.जी.जी. पारीख, एड. गोपाळराव लिमये, वसंत पाटील, उल्काताई महाजन, सुरेखा दळवी आदी प्रतिष्टीत नागरिक या संविधान जागर यात्रेत सहभागी होणार आहेत.