• Login
Friday, March 24, 2023
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

देश जोडला, पक्षाचे काय?

Varsha Mehata by Varsha Mehata
February 8, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
पाच दिवस भीतीच्या छायेखाली तळघरात; नेत्रन धुरीची माहिती
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘भारत जोडो’ यात्रेमुळे राहुल गांधींमध्ये पोक्तपणा आला. लोकांना भेटल्याने त्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावल्या. मात्र या यात्रेमुळे काँग्रेसला मते मिळतील का, संघटनात्मक पातळीवर काही फरक पडेल का, विरोधकांची एकजूट घडवण्यात काँग्रेस यशस्वी होईल का, विविध राज्यांमधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस यशस्वी होईल का आदी प्रश्‍नांची उत्तरे मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या साडेतीन हजार किलोमीटरच्या ‘भारत जोडो’ यात्रेची श्रीनगरमध्ये सांगता झाली. या साडेचार महिन्यांच्या काळात राहुल गांधी देशातल्या वेगवेगळ्या घटकांमधल्या घटकांना भेटले. त्यांना देश समजला. या माध्यमातून त्यांनी देशापुढील समस्या जाणून घेतल्या. यापूर्वी राहुल गांधी यांना भारतीय जनता पक्षाने ‘पप्पू’सारखी वेगवेगळी विशेषणे बहाल केली. त्यांचे राजकारण गांभीर्याचे नसते, अशी टीका झाली; परंतु या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्यात पोक्तपणा आला. आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील लोकांशी भेटीमुळे त्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावल्या. 136 दिवसांच्या या प्रवासात राहुल यांनी थेट जनतेशी संपर्क साधला. लोक त्यांच्या यात्रेत उत्साहाने सामील झाले. त्यावर बरीच चर्चा झाली. याबाबत अनेक मोठे प्रश्‍न आहेत. यातील पहिला म्हणजे प्रत्येक प्रवासामागे एक उद्देश होता. राहुल यांच्या दौर्‍यामुळे काँग्रेसला मते मिळतील का, या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये काही फरक पडेल का, विरोधकांची एकजूट घडवून आणण्यात ते कितपत यशस्वी होणार, लवकरच होणार्‍या विविध राज्यांमधील विधानसभा आणि पुढील वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला या यात्रेमुळे काही उपयोग होईल का असे बरेच प्रश्‍न निर्माण झाले. त्यांची उत्तरे मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ऊन, वारा, पाऊस, थंडी यापैकी कशाचीही पर्वा न करता राहुल या यात्रेत चालत राहिले. त्यांच्या या दौर्‍यात पुढच्या वर्षी निवडणुकीला सामोरी जाणारी काही राज्ये होती. त्यातील कर्नाटक आदी राज्यांमध्ये काँग्रेसमधील गटबाजी काहीशी कमी झाली असली तरी राजस्थानमधील गटबाजी संपलेली नाही. उलट, तिथे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर दिसत आहे. श्रीनगरमधल्या लाल चौकातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर राहुल यांनी राष्ट्रध्वज फडकावला. त्यांची पहिल्या टप्प्यातील ‘भारत  जोडो’ यात्रा संपली असली तरी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू होणार आहे. तसेच महात्मा गांधींचे पोरबंदर हे जन्मस्थळ ते ईशान्य भारत या दरम्यानचा ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील ‘भारत जोडो’ यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना जाणून घेतलेला देशभरातील मतदारांचा कौल पाहता या यात्रेतून काँग्रेसच्या हाती काही आले आहे, असे दिसत नाही. राहुल यांच्यासमोरची आव्हाने कायम आहेत. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून देश जोडला गेला. द्वेषाने नाही, तर प्रेमाने जिंकण्याचे काम करायचे आहे, असे राहुल यांनी वारंवार सांगितले असले तरी पक्षवाढीसाठी त्यांच्या भावनिक आवाहनांचा फारसा फायदा होईल, असे दिसत नाही.
‘भारत जोडो’ यात्रेचा रोडमॅप गेल्या वर्षी उदयपूर इथे झालेल्या चिंतन शिबिरात तयार करण्यात आला होता. यामध्ये जनतेशी जोडण्यासाठी सांस्कृतिक दौरा सुरू करण्याची गरज भासू लागली. जनतेशी थेट संपर्क हा त्यामागील मुख्य उद्देश होता. पक्षाला वाटते की 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेपासून दूर राहणे ही त्यांच्यासाठी समस्या बनली होती. या यात्रेच्या माध्यमातून देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय तयार करण्याचा हेतू होता; परंतु तो साध्य झाला का, या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी आहे. विरोधक अजूनही राहुल यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वीकारायला तयार नाहीत, हे यात्रेच्या काळात वेगवेगळ्या राजकीय पक्षांना दिलेली निमंत्रणे आणि त्यांची उपस्थिती यावरून लक्षात यायला काहीच हरकत नाही. सर्व विरोधक राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका आहेत. त्याचबरोबर या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने राजकीय प्रभाव निर्माण केला, हे नाकारता येणार नाही. यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले लोक हा याचा पुरावा आहे; पण ही गर्दी काँग्रेसच्या मतांमध्ये रूपांतरित होईल का, याबाबत साशंकता आहे. यासाठी ‘इंडिया टुडे-सी व्होटर’ सर्वेक्षणाचे उदाहरण घेता येईल.
या सर्वेक्षणात एक लाख 40 हजार 917 लोकांच्या प्रतिसादाचा समावेश करण्यात आला. यामध्ये 37 टक्के लोकांनी या यात्रेमुळे खळबळ माजल्याचे सांगितले; पण यामुळे काँग्रेसला निवडणुकीत विजय मिळवता येणार नाही. राहुल यांच्या दौर्‍याने विरोधकांचीही एकजूट झाली नाही. भारत राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, डावे, बहुजन समाज पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल हे देशातील प्रमुख पक्ष राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेपासून दूर राहिले. समारोप समारंभाला आमंत्रित करण्यात आलेल्या पक्षांच्या यादीतून ‘आम आदमी पक्षा’ची अनुपस्थिती द्वेषाचे राजकारण प्रतित करते. काँग्रेसने सुमारे डझनभर भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावले. ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीमध्ये असतानाही ‘आप’ चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यात भाग घेतला नाही. यावरूनच विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून येते. आता काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याऐवजी इतर पक्ष आणि नेते विरोधकांचे नेतृत्व करण्यासाठी उभे राहिले आहेत. यातील दोन मोठी नावे म्हणजे केजरीवाल आणि ममता बॅनर्जी. अशा प्रकारे विखुरलेले विरोधक पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत. यावर विश्‍वास ठेवणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे. विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल यांच्यापेक्षा केजरीवाल किंवा ममता बॅनर्जी अधिक योग्य असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये राहुल यांना फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती या दोघांचा पाठिंबा मिळाला. राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल त्यांच्यासोबत आहेत. सप, बसप, द्रमुक हे पक्षही त्यांच्यासोबत जाऊ शकतात. ‘आप’च्या रूपाने देशात वेगाने उदयास येत असलेल्या शक्तीचे पालन न केल्याने प्रश्‍न निर्माण होतात. राहुल यांच्या यात्रेचा परिणाम या वर्षीपासूनच दिसू लागेल. या वर्षी नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. यापैकी दोन राज्ये अशी आहेत, जिथे काँग्रेसचे सरकार आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सरकार वाचवण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. 2024 च्या निवडणुकीतही काँग्रेसला आपली स्थिती मजबूत करण्याची गरज आहे. उपांत्य फेरी मानल्या जाणार्‍या या निवडणुकांमध्ये पक्षाने चांगली कामगिरी केली तरच हे घडेल. अशा स्थितीत ‘भारत जोडो’ यात्रेच्या किंचित यशाने राहुल किंवा इतर काँग्रेस नेते उत्साहित होऊ शकतात. पण, या राज्यांमधील निवडणुकांचे निकाल काँग्रेसचे भवितव्य ठरवतील. यात्रेदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवास हा राजकीय हेतूनेच होत असतो. राहुल यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या प्रवासातील उपलब्धी सविस्तरपणे सांगितली, तेव्हा जनतेशी संपर्क साधल्याचा सर्वात मोठा आनंद व्यक्त केला. राहुल यांनी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आणि जनतेचा पाठिंबा देशाच्या हितासाठी असल्याचे सांगितले. आज दुर्बल लोक भयभीत वातावरणात जगत आहेत. ही भीती त्यांच्या मनातून काढून टाकण्याची नितांत गरज आहे. राहुल यांच्या म्हणण्यानुसार, या प्रवासातून त्यांना अनेक अनुभव आले. खूप काही शिकायला मिळाले. काँग्रेसच्या खात्यात अजूनही छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्ये आहेत. मोदी यांच्या काळात भाजपच्या लाटेतही काँग्रेसने हिमाचल पुन्हा मिळवले; मात्र अहमदाबादपासून दिल्लीपर्यंत भाजपने गुजरात विजयाचा जल्लोष साजरा केल्यामुळे काँग्रेसला हिमाचलच्या विजयाचे भांडवल करता आले नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली स्थिती मजबूत करायची असेल, तर इतर राज्यांमध्येही कामगिरी सुधारावी लागेल. त्याचप्रमाणे राजकीय आव्हाने पेलत आप्तस्वकियांना जपावे लागेल. मोठे, प्रभावशाली नेते यापुढे पक्ष सोडून जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे राजकीय सजगता निर्माण करुन कार्यकर्त्यांना ठोस काम द्यावे लागेल.

प्रा.नंदकुमार गोरे

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

कर्नाटकमध्ये राजकीय रस्सीखेच चर्चेत

March 22, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

पुन्हा खलिस्तान  

March 22, 2023
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

हा तो नव्या-जुन्याचा संगम!

March 21, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

तोतयांचे सूत्रधार कोण?

March 21, 2023
पोफळीत वीजेचा शॉक लागून मुलीचा मृत्यु
संपादकीय

कर्जांच्या अर्थकारणातली ‘ताईगिरी’

March 20, 2023
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
संपादकीय

संपाचा धडा

March 20, 2023

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022
  • August 2022
  • July 2022
  • June 2022
  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021
  • January 1970
  • July 220

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
  • नांदेड
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?