2022 मध्ये होणार क्रिकेट धमाका

। मुंबई । वृत्तसंस्था ।
2021 वर्ष भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये शानदार असे ठरले. वर्षाची सुरूवात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकून झाली आणि त्यानंतर अखेरची लढत दक्षिण आफ्रिकेत सेंच्युरियन मैदानावर ऐतिहासिक विजय मिळून झाली. आता 2022 साली भारत आणि महत्त्वाच्या लढती खेळणार आहे. यात कसोटी सोबत मर्यादित षटकांच्या मालिकांचा समावेश असणार आहे. श्रीलंकेचा भारत दौरा- वेस्ट इंडिजचा भारत दौरा झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात 3 टी-20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा- श्रीलंका दौरा झाल्यानंतर आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होईल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात 5 टी-20 सामन्यांची मालिका होईल. टी-20 वर्ल्डकपच्या आधी भारतीय संघाला तयारीसाठी याचा फायदा होऊ शकतो.भारताचा इंग्लंड दौरा- मादेशात आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर भारत इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. तेथे गेल्या वर्षी करोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाचवी कसोटी खेळवली जाईल. त्यानंतर प्रत्येकी 3 सामन्यांची टी-20 आणि वनडे मालिका होईल.

Exit mobile version